Friday 16 September 2022

कितीही असोशीनं

कितीही असोशीनं, 
कसोशीनं,
पागोळीखाली पावलं पुन्हापुन्हा नितळून घेत,
स्वच्छ मनानं हात हाती धरू पाहिले, 
तरीही अखेर -
रस्ते आपले आपल्यालाच चालायचे असतात.
कुणीही झालं, 
कितीही झालं,
तरी आपल्या प्राणांवर नभ धरू शकत नसतं कधीच.
अखेर मुक्काम आपले आपल्यालाच ओळखावे लागतात.
सोडावेही. 

No comments:

Post a Comment